Followers

Wednesday, 16 August 2017

विचार तर करा

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामध्ये कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्दा आपल्या जंगलाला एव्हढी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमध्ये आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच अडचणी आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा कां ?  हा अमेरीकन माणुस स्टॅनफोर्ड या प्रसिध्द विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्र मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र मिळुन फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना अॅडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रीटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुध्दा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदललते ( त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते ). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या दुष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक प्रसिध्द सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणुनच प्रसिध्द आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “ भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय ( Unique ) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मिळणार नाहीत. भारतियांनाच या समस्यांवर तोडगा शोधुन काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. एव्हढी असुनही भारताने जी प्रागती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात.असाच एक अमेरीकन इंजिनीयर भेटला. तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक  सरकारवर फार अवलंबुन आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबुन असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणीकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणुन दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहुन कायदे कानुन पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापसुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नगरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दामुनच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रागत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हाणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळुन 70 वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशाविषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरिचे आहे. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उध्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार? आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येइल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रागती केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे, सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्रहावरून आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे     त्याने ठेवावे हीच अपेक्षा.चला तर! आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया !                                                                                    

Sunday, 6 August 2017

Parents

yogayog

*भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला*.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
*पण कंपनीच्या लोकांनी* *विमानतळावरच घेरले*
*आणि भव्य सत्कार केला*.
सजवलेल्या गाडीत   बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
*साहेब आज इथ थांबा*.
*सगळ्यांचा आग्रह*.
*साहेब गाडीतून उतरले*.
*आजूबाजूचे लोक फुले उधळत होते*.
काय सांगाव ते कौतुक.......
       
*साहेब दरवाजा पर्यत आले*.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
*आणि* .
*विजे चमकावी तसे चमकले*....
*आणि*
*तक्षणी माघारी फिरले*. ...
*दरवाजा जवळ आले*...
*डोअर किपरने खालची मान वर केली* ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.

*आणि आणि* ...

*दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले*. .
*साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला*.
*आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले*....

बाबा.......बाबा 

तुम्ही  इथे.....

*आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले*.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.

         
*आपल्या मुलाने परदेशी जावे*.
*मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता*.
ओव्हर टाईम करत होता.
*पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता*.
          
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.

       
*दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा*.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
       
*आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता*.

आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.

    
*मला सांगा यात श्रेष्ठ कोण*

तो साहेब की तो डोअरकिपर

*तो आँफीसर की नोकर*

तो मुलगा की बाप....

     
*यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो*.

              तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
*पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही*.

हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
*त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही* ?

            आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
*आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप*.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
           *लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप*..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
*ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात*.

बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
*आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल*.

           ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
*पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत*.
  माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही *दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो*. *टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते*.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
*आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता*.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .

*मला जेव्हा विचारले जाते*

जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो

*जगात यशस्वी कोण* ?
*ज्याला आई बापाची कींमत कळाली तो*

जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

*जगात नालायक कोण*?
*ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले*.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.

*मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या* *मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात*
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
👆*तुम्ही हा मँसेज ३ गुरूप वर पाठवा👆👆
*वडिलांना समर्पित*💐

Friday, 4 August 2017

Just dial

टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी...Just dial
एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे उदाहरण.
8000 कोटींच्या कंपनी च्या मालकाची हि प्रेरणादायी कथा.
ही कथा आहे जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या एका तरुणाची - 'व्ही.एस.एस.मणी'ची! त्याचा जन्म एका पारंपारिक मध्यमवर्गीय तमिळ कुटूंबात झाला. वडील कोलकत्ता या शहरात नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. मणी चार बहिण भावंडांमध्ये सगळ्यात मोठा. घरात शिक्षणाचे वातावरण. त्यामुळे मुलांनी शाळा कॉलेजात मन लाऊन अभ्यास करावा, भरपूर गुण मिळवावेत आणि चांगली सुरक्षित नोकरी पटकावावी हा नोकरदार संस्कार. त्याच सगळ बालपण कोलकत्त्यात गेल.
पुढे वडील नोकरीनिमित्त दिल्लीला आले, सगळ कुटुंब दिल्लीला हलवलं. दरम्यान मणीने पदवी पूर्ण केली होती आणि चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेत होता. हे शिक्षण चालू असताना वडिलाची नोकरी गेली. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मणीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने एका यलो पेजेस कंपनीत सेल्सपर्सन म्हणून नोकरी सुरु केली.
यलो पेजेस म्हणजे उद्योग-व्यवसायांची नाव, पत्ता व फोन नंबर यांची यादी असलेले एक मोठे जाडजूड छापील पुस्तक. प्रत्येक मोठे शहर किंवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र पुस्तक. जर एखाद्याला उद्योग व्यवसायाचा पत्ता हवा असेल तर तो त्या यादीत शोधणार.
या कामासाठी मणीला अनेक ग्राहकांना भेटावे लागायचे. त्यातील एका ग्राहकाने सुचवले की पत्ता शोधणार्यासाठी हे किती कटकटीचे काम आहे. त्यापेक्षा असा हवा असलेला पत्ता आपल्याला फोनवर मोफत मिळाला तर?
बस्स! याच एका कल्पनेवर मणी, तो ग्राहक आणि एक मित्र अशी तिघांनी १९८९ साली आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. माहिती हवी असलेल्या ग्राहकाच फोन आला की माहिती देताना जाहिरातदाराच्या माहितीला प्राधान्य द्यायचे. जाहिरातीतून उत्पन्न मिळणार. कंपनीची सुरवात तर चांगली झाली, पण लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि कंपनीला त्याचा फटका बसला. तोटा सुरु झाला. भागीदारांबरोबर मतभेद होत होते, शेवटी तो १९९२ साली त्यातून बाहेर पडला.
पुढे चार वर्ष त्याने इतर धडपड केली. पण रात्रंदिवस मात्र स्वतःची टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी सुरु करायची याची स्वप्ने पाहत होता. त्याचे आदर्श होते धीरूभाई अंबानी आणि टाटा! त्यांच्यासारखच एक दिवस आपण पण खूप मोठ बनायचंच हा त्याचा निर्धार पक्का होता. लाखो लोक आपल्या कंपनीची सेवा घेत आहेत अस भव्य चित्र तो तपशीलवार रंगवायचा.
१९९६ ला त्याने मुंबई गाठली आणि ५०,००० रु. गुंतवून जस्ट डायल नावाने कंपनी सुरु केली. ग्राहकांच्या सहज लक्षात राहील असा टोल फ्री नंबर मिळविला ८८८-८८८८. भांडवल खूपच कमी असल्याने जागा, फर्निचर, कॉम्प्यूटर, सगळ-सगळ भाडे तत्वावर घेतल. गल्लीबोळात माणसे पाठवून वेगवेगळ्या उद्योगधंदे व्यवसायांची माहिती गोळा केली. खूप संघर्ष करावा लागला. पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. पण कंपनी बंद करण्याचा विचार कधीच केला नाही. नेटाने, चिवटपणे तो लढत राहिला.
हळू हळू कंपनीची कीर्ती माऊथ पब्लिसिटीने सगळीकडे पसरू लागली तस तशी कंपनी पण विस्तारत गेली. कंपनी वाढवताना मणीने फक्त एकाच गोष्टीचा विचार केला, तो म्हणजे - मी ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकतो? रोज मी त्यात काय सुधारणा करू शकतो?
फक्त या सूत्रावर कंपनी इतकी मोठी झाली की २०१३ साली कंपनी शेअर बाजारात नोंदवली गेली. अमिताभ बच्चन सारखी हस्ती त्यांच्यासाठी ब्रँड अँबेसिटर म्हणून काम करू लागली. २०१४ मध्ये कंपनीचे मूल्य होते ८००० कोटी रुपये! आता अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांचा कारभार पसरला आहे. ती आता एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.
१९९६ ते २०१४ - अठरा वर्षात ५० हजार ते ८००० हजार कोटी रुपये आणि कल्पना काय तर गल्लीबोळातील उद्योग व्यवसायाची माहिती फोनवर मिळणार!एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे अप्रतिम उदाहरण.

Good

पापा पापा धरती किसने बनाई?
बेटा भगवान ने बनाई।

आसमान किसने बनाया?
भगवान ने।

सितारे किसने बनाए?
भगवान ने।

हमें किसने बनाया?
भगवान ने।

पेड़-पौधे कैसे उगते है?
भगवान की मर्जी से।

लोग कैसे मरते है?
भगवान की मर्जी से।

लोग पैदा कैसे होते है?
भगवान की मर्जी से।

रोशनी कैसे मिलती है?
भगवान की कृपा से।

अँधेरा कैसे हो जाता है?
भगवान की इच्छा से।

बेटा इतने सवाल मत पूछो , इस धरती पर, ब्रह्माण्ड में जो भी कुछ होता है सब भगवान की मर्जी से
होता है।

एक दिन बच्चे के विज्ञान टीचर बच्चे के घर आते है। देखिये वर्मा जी, आपका बच्चा पढने में बहोत कमजोर है , पढ़ाई-लिखाई में ध्यान ही नहीं देता है।

टेस्ट में सवाल पूछा गया ,
बल्ब रौशनी कैसे देता है?
जवाब में लिखा, भगवान की मर्जी से।

टेलीफोन किसने बनाया?
भगवान ने बनाया।

धरती पर दिन और रात कैसे होते है?
भगवान की मर्जी से।

माफ़ कीजिये बताते हुए अच्छा तो नहीं लग रहा लेकिन
आपका लड़का फेल हो गया है।

वर्मा जी ने गुस्से से कांपते हुए लड़के को बुलाया , डांटते हुए, क्यों बे? हमारे लाड-प्यार का नाजायज फायदा उठाता है, पढ़ाई-लिखाई में दिमाग क्यों
नहीं लगाता है? और दो तमाचे रसीद करते हुए बोले,
कमबख्त फेल हो जाएगा तो जिन्दगी में क्या करेगा?
और बेचारा बच्चा समझ ही नहीं पाया कि उससे
गलती कहाँ हुई?

काश! वर्मा जी ये समझ पाते कि बच्चे की जिज्ञासा को
अगर वो भगवान से तुष्ट न करते, तो बच्चा उन सवालों के जवाब विज्ञान में ढूंढता।

उस बच्चे की सारी कल्पनाएं , जिज्ञासाएं ,
खोजी प्रवृत्ति तो एक भगवान पर आकर ही खत्म हो
गयीं, भला इसमें उस बच्चे की क्या गलती
है जो उसे विज्ञान की समझ न आई ?

क्या आप भी चाहते है कि आपके बच्चे फ़ैल हो ?
नहीं ना ?
तो फिर आपके बच्चों को विज्ञान की कहानियां सुनाओ... देवी-देवता और भगवान की नहीं ! उन्हें विज्ञान का रहस्य समझाओ, जूठी-मुठी कहानिया नहीं।
उन्हें तर्क करना सिखाओ...

विज्ञान को धर्म बनाओ... आपका बच्चा अवश्य तरक्की करेगा।

अपना विकास स्वयं करो, आपका उद्धार आपको खुद ही करना होगा।

🖌📚🖌📚🖌📚🖌

Sunday, 30 July 2017

निरोगधाम

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
        🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवल्यानंतर अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावे ?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवणानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री कधी  झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पाणी  केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोबर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भाड्यातील पानी केव्हा पिणे चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या टिप्स आपल्या निरोगी आरोग्यसाठी बहुमूल्य  आहेत . तुम्ही आमच्या जीवाभावाची प्रेमळ माणसं आहात म्हणून आमच्या प्रेमापोटी ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ कराल हिच नम्र विनंती . लोभ असावा.🙏

Monday, 1 May 2017

महाराष्ट्रा "बाबत माहिती

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड
👉 आश्रम शाळेचे वेळेवर पगार होणारा जिल्हा लातूर
👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा  ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

Bad patch

*बॅड पॅच- एक संघर्ष...*
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

 करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

 नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

 व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

 पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
 काय बोलतो,
काय करतो,
 काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
 आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

 यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
               तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
               तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
             
मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....
             
 चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
               
  *स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा बस्सससससससस*
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

Good

!!

      *तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नाही...*
      *.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..*
     *.एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.*
     *."अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण  "बाळगुन जगू" नये..*
       *.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.*
      *.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.*
       *.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*
    *."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे*
    *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम ध्या*


🌠🌸🌠🌸🌠🌸🌠

1 मेपासून RERA लागू होणार!*_

👉 _*1 मेपासून RERA लागू होणार!*_

1 मे पासून रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (RERA) लागू होणार असून त्याअंतर्गत नवीन घर खरेदी करताना 1 मेपासून नवीन बदल होण्याची शक्यता आहे. या नवीन कायद्यामुळे बिल्डरांच्या मनमानीला चाप बसणार आहे.  त्यामुळे जर तुम्ही घर घेऊ इच्छित असाल तर 1 मे 2017 ची वाट पहा व त्यानंतर घर खरेदी करा.

_*काय बदलणार RERA अॅक्टमुळे?*_

👉 रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट लागू झाल्यानंतर बिल्डरांशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी  प्रत्येक राज्यात स्टेट रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाची स्थापन केली जाईल.

👉 घराचा ताबा घेण्यासाठी ग्राहक बिल्डरला एक वर्षांच्या आत लेखी स्वरुपात संपर्क करु शकतो.

👉 बिल्डर योजनेत कोणताही बदल करु शकत नाही. जर नियम बदलण्याआधी बिल्डरला ग्राहकाची लेखी मंजुरी घेणे आवश्यक आहे.

👉 बिल्डरांना 70 टक्के रक्कम जी ग्राहकांनी दिली आहे, ती एकाच अकाऊंटमध्ये ठेवून सुरु असलेल्या प्रकल्पात गुंतवावे लागतील.

👉 RERA कायद्यानुसार, रिअल इस्टेट प्रकल्पाचा प्रत्येक टप्पा हा एक वेगळा प्रकल्प मानला जाईल. जर एखाद्या बिल्डरने 5 टप्प्याचा प्रकल्प सुरु केल्यास त्याला 5 वेळा नोंदणी करावी लागेल.

👉 प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. यामध्ये जागा, सरकारी आदेश, किंमत, बिल्डिंगचा लेआऊट इत्यादी माहिती सांगणे आवश्यक आहे.

👉 RERA च्या नियमानुसार, ग्राहकांना कार्पेट एरिया सांगणेही आवश्यक असणार आहे.

👉 RERA लागू झाल्यानंतर जर प्रकल्पाला उशीर झाला तर बिल्डरला हफ्त्याच्या व्याजाची काही रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल.

👉 RERAच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 3 वर्षांचा कारावास आणि दंड लागू शकतो.

👉 प्रत्येक बांधकाम सुरु असलेला आणि त्यापुढील प्रकल्प हा RERA च्या कार्यकक्षेत येईल. जर कोणत्याही बिल्डरने त्याच्या प्रकल्पांची नोंद केली नाही, त्याला संबंधित प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या 10% टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागू शकतो.


🙏🌺🌺🌺🌺🌺🙏

Doctor

ब्रँडेड औषधांच्या नावाखाली डॉक्टर लुटतात, असं ज्यांना वाटतं, त्यांनी हॉटेलात गेल्यावर मिनरल वॉटर ऐवजी नळाचं पाणीच् मागावं..
किंवा जर ड्रिंक्स घेत असाल तर ब्रँडेड दारूऐवजी 'देशी दारू' प्यावी.. दोन्हीत एकच molecule असतो.. दोन्हीही 42.8%v/v  Ethyl alcohol च् आहेत.. मग उगीच कशाला महाग महाग दारू पिऊन पैसे वाया घालवायचेत.? हो ना?

जो फरक टपरीवर भजी खाण्यात आणि मोठ्या हॉटेलात भजी खाण्यात असतो तोच फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये असतो.. टपरीवरची भजी स्वस्त असली चविष्ट वाटली तरी ती बनवताना raw मटेरियल किंवा तेल काय प्रतीचं वापरतात हे आपल्यालाही माहिती आहेच..

Molecule जेनेरिक आणि ब्रँडेड औषधामध्ये एकच असले तरी efficacy मध्ये प्रचंड फरक असतो .. Ceftum च्या ४ गोळ्यात इन्फेकशन कंट्रोलला येते .. पण जेनेरिक च्या १० गोळ्या घेतल्या तरी ओ की ठो फरक पडत नाही ..नंतर डॉक्टर्सच्या औषधाला गुण नाही म्हणून डॉक्टर्सनाच बडवायला मोकळे..

मुख्य raw मटेरियल काय quality चे वापरतात यावर results ठरतात .. ब्रँडेड चे raw मटेरियल युरोप किंवा इतर ठिकाणावरून आयात केलेले असते त्यामुळे महाग असते पण दर्जेदार असते, त्यात परत त्या औषधाचा research चा खर्च ऍड होतो..

सरकारने जेनेरिक ची सक्ती केल्यास sub-standard मालाची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार होईल..

ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांना दर्जेदार औषधाचा लाभ का घेऊ देऊ नये ? ..ज्यांना जेनेरिक हवे, त्यांनी जेनेरिक घ्यावी .

चौकात डोसा ३० रुपयाला मिळतो .. 'वैशाली'त १०० रुपयाला मिळतो ..डोसा हा डोसा च आहे ना ? ..मग 'वैशाली'त जास्त पैसे घेऊन लोकांना लुटले जाते का? ..Qualityचा विषय पण पैशाच्या पलीकडे जाऊन असतो, हा विचार व्हावा..

बरं ..औषधांच्या किंमती सरकारच्याच नियंत्रणाखाली असतात ना? मग ४ रुपयांची गोळी ४० रुपयाला मिळते म्हणून डॉक्टर्सना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे ..४० रुपये किंमत डॉक्टर्सनी ठरवलीय का ?

आणि प्रत्येक गोष्ट किंमती वरच जज् करायची झाली तर आपल्याकडे नवीन संशोधन येणारच नाही.. कारण त्याची पण किंमत कॉस्ट मध्ये add होते .. जेनेरिकची सक्ती करून लॉन्गटर्म मध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आहोत..

**

तोंडाच्या अल्सर साठी Neurobion forte ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची गोळी द्यायची असेल तरी डॉक्टरला खालील prescription द्यावे लागेल-
1.thiamine mononitrate 10 mg
2. riboflavin 10 mg
3. pyridoxine hydrochloride 3 mg
4. cyanocobalamin 15 mcg
5. nicotinamide 45 mg
6. calcium pantothenate 50 mg.

गमतीचा भाग जाऊ द्या पण जर सरकारने डॉक्टरांना जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सक्ती केलीच, तर त्यात शेवटी एक ओळ आवर्जून टाकावी.

*"हे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक असून रुग्णाला कुठल्या कंपनीचे, ब्रँडचे अथवा क्वालिटीचे औषध मिळेल, यावर डॉक्टरांचे काहीही नियंत्रण नसून, गुण न आल्यास कृपया औषध कंपनीशी संपर्क साधावा."*

किंवा खालील प्रमाणे consent घ्यावी..

I Dr ________, would like to inform you that I am prescribing you medicines in the generic
name  according to the guidelines of the MCI , WHO and various govt bodies etc in your best interest and to my best knowledge.
I would like to inform you that there are basically two types of  drugs manufactured one innovator or research molecule and the other group called generic drugs.
I would also like to inform you that there is one innovator drug Brand and many generic brands .
The innovator drugs are generally expensive if it is not in the essential drug  price control.
I would like to also inform you that I am not liable for the side effects ,reaction etc which these drugs may cause other than the known side effects.
I am also not liable-
For the efficacy of the drug
For the quality of the drug
For the  potency of the drug
For the impurities that may be present
For any resistance that you may develop
Whether they are counterfeits
Whether there are any other adverse reaction
It is the responsibility of
MCI
FDA
Drug Company
The dispensing pharmacist, pharmacy or hospital and policy makers.

I have no role in the selection of these drugs nor can I influence the hospital, pharmacy, pharmacist, patient over the choice of drugs.

I am not liable for Any medico legal cases that may occur in the future concerning the concerned drugs and all such queries etc should be directed to the above responsible parties.

It is entirely your responsibility which drug brand you choose and I will not be liable for the same.
For full information on innovator drugs brand name and generic company there are lots of online website were you can get the information.or you can ask the pharmacist who will/should give you the said info.

If after reading this you give me consent then I will prescribe you medicines with a Belief  and  knowledge that it will
/ may help you in the course  of treatment .
Please mark below what type of drugs you would prefer. .

Thanking you. For placing your trust and health in my hands.

Dr.___________
Degree:_______                      
Sign:
Reg no:________
Council: _______                          

Patient's name:
______________                                                Date:__________

**

Good

*संस्कार.....*

प्रसंग पहिला....
      माधव उठला आणि आईच्या रूम मध्ये गेला.. तिच्या कपाळाला हाथ लावून पाहीला तर अंग चांगलच तापल होत... रात्रभर खोकल्याची उबळ तिची चालु होती.. त्याच्या मागे मालतीही आली.
         तिला बघुन तो म्हणाला "मालती मी आज ऑफिसला जात नाही.. आईला घेवून दवाखान्यात जातो.. तू चिन्मयला तयार कर.. जाता जाता त्यालाही शाळेत सोडून जाईल.."
        " मी ही थांबू का?..मी पण नाही जात ऑफिसला" मालती म्हणाली.
         तसा माधव म्हणाला "अग असे दोघांना घरात थांबायची आवश्यकता नाही ... तू जा ऑफिसला... आईचे खायचे प्यायचे बघुन जा आणि तशी गरज लागल्यास मी तुला बोलावून घेईन.."
        नुकताच उठलेला चिन्मय दारात उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत होता.. त्याला पाहुन मालती उठली आणि पुढच्या तयारीला लागली...
         माधवने आईला उठवले...तिची पांघरून आवरता आवरता तिथेच उभ्या असलेल्या चिन्मयला म्हणाला "चिन्मय, आज आज्जीला बर नाही तिला त्रास द्यायचा नाही... चल आवर लवकर मी तुला शाळेत सोडतो आणि हो आईला सांग आज्जी उठलीय     तिचा चहा आण म्हणाव..."
    चिन्मय आईला निरोप द्यायला गेला तस त्याने आईला म्हंटल
           "तुझा ताप आणि खोकला अजुन कमी नाही झालाय... तू आटप आवर... आपण सकाळी सकाळी दवाखान्यात जावुन येवू .. "
          आई ने फक्त बर म्हंटल आणि आपल आवरायला घेतल.
            इकडे मालतीने स्वतःची, चिन्मयची तयारी केली... डबे भरले... माधवचे, आईचे खायचे तयार करून ठेवले... माधवला फळ, ज्यूस आणि इतर आईचे पथ्याचे कुठे ठेवले ते सांगितले..आणि ती ऑफिसला निघाली...
         जाता जाता आईच्या रूम मध्ये डोकावून तिला म्हणाली "आई, काहीही लागल तर फोन करा... येते मी.."
       चिन्मय तयारच होता ...
       माधव आईच्या रूम मध्ये गेला... तिला हलकेच हाथाने धरून गाडीपाशी आणले..चिन्मयला गाडीचे मागचे दार उघडायला लावले..
      आईला मागच्या सिट वर बसवले... खालीवाकुन तिचे पाय हाथाने उचलून अलगद गाडीत ठेवले आणि गाडीचा दरवाजा बंद करता करता चिन्मयला म्हणाला
       "जा आज्जीची पाण्याची आणि औषधाची पिशवी आत टेबलावर ठेवली आहे ती घेवून ये...तसा चिन्मय पळत जावून ते घेवून आला, तोपर्यंत माधवने गाडी बंगल्याच्या दरवाजात आणून उभी केली होती..
         चिन्मय आल्यावर तो म्हणाला "चिन्मय आज पुढे नाही बसायच ... आज आज्जी शेजारी मागे बस.."
         एरवी पुढे बसण्यासाठी हट्ट करणारा चिन्मय आज चुपचाप मागे बसला आणि ते रवाना झाले..
          दुपारी चिन्मय शाळेतून घरी आला तेंव्हा माधव आईच्याच रूम मध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसला होता..
           चिन्मयच्या मागे लगोलग मालतीही आली... तिला इतक्या लवकर बघुन दोघांनाही आच्छार्य वाटले.
          पण ती म्हणाली.
          " काय करू माझ ऑफिसात लक्ष्यच लागत नव्हतं म्हणून आले लवकर.. "
         तिने आईच्या कपाळाला हाथ लावून पाहिला ... ताप कमी झाला होता... खोकलाही आता नव्हता.
        थोड्या वेळात आईही उठली... थोड़ी फ्रेश वाटत होती.. तिचा नेहमीच्या हसरा प्रसन्न चेहरा बघुन सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसु पसरले..
       चिन्मयला बघुन आज्जीने त्याला जवळ बोलावले; तसा तो टुणकन उडी मारून आज्जीच्या मांडीवर जावून बसला... आज सकाळ पासून पहिल्यांदा आज्जीने त्याला जवळ घेतले होते.
     तो आज्जीला बिलगला तसे सगळे प्रसन्न खुदकन हसले..
आता प्रसंग      दूसरा......................
           सहा महिन्यानंतर,
        माधव कामानिम्मित्त दिल्लीला गेला होता... त्याची आई गावी गेली होती...
      घरात फक्त चिन्मय आणि मालती दोघच...
           त्यादिवशी सकाळी सकाळी चिन्मयला जाग आली, 'अरे सहा वाजून गेले अजुन आई कशी उठली नाही..'
तो मनातल्या मनात म्हणाला..
        आईला उठवण्यासाठी त्याने तिला हाथ लावला तर तो चपापलाच... तिला जाम ताप होता...
         त्याला काय करावे सूचना.. कसबस आईला त्याने उठवल... तिला म्हणाला "आई तुला ताप आहे....चल मी तुला दवाखान्यात घेवून जातो.."
          तशी मालती म्हणाली "चिन्मय राहु दे, मी जाईन थोड्यावेळाने, तू आटोप लवकर.. मी रामभाऊंना सांगते तुला सोडायला शाळेत..."
           "नाही आई मी आज शाळेत नाही जाणार... बाबा पण नाहीत... तूच आटोप आपण दवाखान्यात जावू... मी डॉक्टरांना फोन करतो.."
          अस म्हणत तीच पुढच काही ऐकण्याच्या आत तो बाहेर पळाला... आईच्या फोन मधून डॉक्टरांना फोन लावला... दूसरा फोन बाबांना केला...
             तसा माधव चिंतित झाला... त्याने फोन मालतीला द्यायला सांगितला..
           "काय ग, काय झाल..?"
            "काही नाही कणकण आहे... रात्री गोळी घेतलीय होईल ठीक.. पण आज ऑफिसल नाही जात.." मालती क्षीण आवाजात म्हणाली.
          "कणकण नाही बाबा, चांगला ताप आहे..." मालतीच्या अंथरुणाच्या घड्या घालता घालता तो माधवाला फोन वर ऐकू जाव म्हणून जोरात ओरडला..
          "ठीक आहे एक काम कर, मी रामभाऊंना सांगतो ते तुला दवाखान्यात घेवून जातील आणि तसेच चिन्मयलाही शाळेत सोडतील... तू तयार रहा...डॉक्टरांना ही फोन करतो... आणि तसाही मी संध्याकाळच्या फ्लाईटने परत येतोच आहे...आणि ऐक ज़रा चिन्मयला फोन दे..." माधव म्हणाला.
           चिन्मयने फोन घेतला आणि माधव काही म्हणायच्या आत चिन्मय म्हणाला " बाबा मी शाळेत जात नाहीये.. आईला घेवून दवाखान्यात जातो... आणि ड़ॉक्टर काकांना मघाशीच फोन करून सांगितलय मी..."
           माधव फक्त एवढच म्हणाला "बर ठीक आहे, आईची काळजी घे ... दंगा करू नको.."
           माधवने मग त्याचा ड्राइव्हर रामभाऊ, डॉक्टर यांना फोन करून सांगितले आणि आपल्याला कामाला लागला..
          संध्याकाळी तो घरी आला...
घर निटनेटके स्वच्छ होते... चिन्मयने कुठलाही पसारा केलेला दिसत नव्हता, दिवा बत्ती झाली होती...मालती डोळे मिटुन आपल्या रूम मध्ये पडली होती आणि चिन्मय तिथेच तिच्या शेजारी अभ्यास करत बसला होता...
           त्याची चाहुल लागताच मालतीने डोळे उघडले... चिन्मय पळत माधवला बिलगला...
         माधवने मालतीच्या कपाळाला हाथ लावून पाहिले ताप कमी होता..
         एवढा वेळ हिरमुसलेला चिन्मय आईचा हसरा चेहरा पाहिल्यावर खुदकन हसला आणि आईच्या कुशीत जावून बसला..
            माधवने मग त्याला खेळायला पाठवले आणि तो मालती शेजारी येवून बसला..
           मालतीने मग सकाळ पासूनच सगळ माधवला डिटेल मध्ये सांगितल..
         चिन्मयने पहिल डॉक्टरला फोन केला.. मग रामभाऊंना फोन करून गाडी तयार करायला सांगितली..
            स्वत:च आपल आपल आवरल...आईसाठी घरकामाच्या मावशी कडून चहा करून आणून दिला.
         मला हाथाला धरून गाडी पर्यंत घेवून गेला....गाडीत बसायच तर म्हणाला मागच्या सिट वर बस....
         स्वतः दरवाजा लावला आणि पुढे न बसता माझ्याशेजारी मागे येवून बसला..
         Vडॉक्टर कडून निघाल्यावर रस्त्यात गाडी थांबवायला लावून डॉक्टरांनी दिलेली औषध रामभाऊंना जावून आणायला लावली...
         घरी आल्यावर, बिलकुल दंगा नाही,टीवी नाही... स्वयंपाकवाल्या मावशींनी जे दिले ते चुपचाप खाल्ल आणि दुपारी माझ्यापाशीच झोपला..
          उठल्यावर दूधही आपल आपल घेतल... मला चहा औषध आणून दिली आणि येथेच अभ्यास करत बसला.
         ते सांगताना मालतीच्या डोळ्यात पाणी येत होत..
             तसा तिला जवळ घेत माधव म्हणाला..
          "मालती, मी तुला म्हणाला होतो ना, संस्कार करावे लागत नाही ते पेरावे लागतात...ते आपोआप उगवतात....
                           आपण जे पेरू ते संस्कार महत्वाचे...नाही का ?
   
*संस्कार हे संस्कार असतात*

*स्वतः बदला आपली पिढी नक्की बदलेल*